जिल्ह्यातील गुणवंतांचा सन्मान सोहळा: आनंदी परिवाराने कोळशाच्या खाणीतून खरे हिरे शोधले : सुरेश देवकर

बुलढाणा :  समाजाप्रती ज्यांचे कुठलेच योगदान नाही, अशा काही प्रवृत्ती गैरमार्गाने पुरस्कार नावावर घेऊन स्वत:च आपली पाठ थोपटून घेत असतात ही एक सामाजिक शोकांतिका  असून यातून समाजात चुकीचा पायंडा पडत आहे. या पृष्ठभूमिवर आनंदी परिवाराने सहा महिने कठोर मेहनत घेऊन कोळशाच्या खाणीतून खरे हिरे शोधल्याचे प्रतिपादन अदिती अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा दैनिक महाभूमिचे मुख्यसंपादक सुरेश देवकर यांनी केले.

बुलढाणा : अलिकडच्या काळात पुरस्कार देण्याघेण्याचे स्वरूप बदलले असल्याचे दिसून येते. प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करून विविध क्षेत्रात आपला ठसठसशीत ठसा निर्माण करणारे, समाजातील तळागाळातील घटकांसाठी जमीनीवर उतरून काम करणारे त्यांच्या हक्कांच्या पुरस्कारापासून वचित राहतात. या उलट  समाजाप्रती ज्यांचे कुठलेच योगदान नाही, अशा काही प्रवृत्ती गैरमार्गाने पुरस्कार नावावर घेऊन स्वत:च आपली पाठ थोपटून घेत असतात ही एक सामाजिक शोकांतिका  असून यातून समाजात चुकीचा पायंडा पडत आहे. या पृष्ठभूमिवर आनंदी परिवाराने सहा महिने कठोर मेहनत घेऊन कोळशाच्या खाणीतून खरे हिरे शोधल्याचे प्रतिपादन अदिती अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा दैनिक महाभूमिचे मुख्यसंपादक सुरेश देवकर यांनी केले.

 मलकापूर रोडवरील देवकर पेट्रोलियमच्या अदिती अर्बनच्या प्रशस्त सभागृहात रविवार 18 मे रोजी अदिती अर्बन व आनंदी परिवारच्यावतीने आयोजित जिल्ह्यातील गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाचे कुलसचिव डॉ.अविनाश असनारे, मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक तथा आनंदी परिवारचे अध्यक्ष डॉ.अण्णासाहेब म्हळसने व मोताळा येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन जाधव यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना सुरेश देवकर म्हणाले की, प्रतिकुल परिस्थिती ही कोणाच्याही यशाच्या मार्गात अडथळा ठरत नाही. आपले ध्येय निश्चीत असेल, हेतू शुध्द असेलतर कुठल्याही क्षेत्रात आपण यशाला गवसणी घालु शकतो. कठोर परिश्रम व जिद्दीतच यशाचे गमक असल्याचेही ते म्हणाले. तर, आनंदी परिवाराने कठोर मेहनत घेऊन खऱ्या प्रतिभावंतांना पुरस्काराच्या माध्यमातून न्याय देण्याचे केलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. असनारे यांच्याहस्ते पुरस्कार सोहळ्याचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात आनंदी परिवारचे अध्यक्ष प्रा.डॉ. अण्णासाहेब म्हळसणे यांनी कार्यक्रमागागील भूमिका विशद करताना आनंदी परिवाराच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी मोताळा येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन प्रा.जगताप यांनी केले.

आनंदी परिवाराचा उपक्रम आनंद फुलविणारा : डॉ. अविनाश असनारे

बुलढाणासारख्या मागासलेल्या जिल्ह्यात आनंदी परिवार व अदिती अर्बन परिवार खऱ्या प्रतिभावंतांचा शोध घेऊन पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम करीत आहे. हे पाहून या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांचा हक्क प्रदान करून दिल्याबद्दल आनंदी परिवाराची कामगिरी निश्चीतच गौरवास्पद असल्याचेही डॉ.असनारे म्हणाले.

या गुणवंतांचा झाला सन्मान

विठ्ठल धांडे, डॉ.नंदकिशोर बोकाडे, पार्थ गायकवाड, सुमित ठाकरे, मोहम्मद आबिद, प्रतिक साबे, संजय सावळे, विशाल राठोड, पराग कडाळे, निखिल जाधव, मीनल जोहरे, राहुल दांडगे, वेदश्री चव्हाण, सोनल खर्चे, शुभम गाडेकर, एैश्वर्या भोंडे, गौरी सोळंके, वेदिका राऊत, अश्वीनी काकडे, देशभूषण लिंगायत, डॉ.धिरज म्हस्के, डॉ.प्रथमेश शिंदे,डॉ.हर्षल पाडळे, डॉ.प्रतीक्षा पाडळे, गोपाल साखरे, प्रगती राजनकर, पवन सोनवने, नेहा बिल्लारी,डॉ.जीवन नरवाडे, प्रा.डॉ.गजानन निकस, प्रजल्व काळूसे, शुभम सरदार, गोपाल सपकाळ, डॉ.आयुष गायकवाड, श्रीराम वाघ, गौरव काळवाघे, राहुल कानडजे, प्राची सोनवणे, डॉ.मयुर घुगे, डॉ.सौरभ जगताप, आशिष वाघ, प्रा.डॉ.रूपाली तेलगड, स्वप्नील बिल्लारी, राम वाघ, प्रा.मधुकर वडोदे,डॉ.मनिषा राऊत, धनंजय वसू, संदेश राठोड, प्रा.डॉ.विनोद गायकवाड, डॉ.अभिजित आरमाळ यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »