dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Lok Sabha Elections: ‘काँग्रेसने ‘लूट ईस्ट’ धोरण स्वीकारले, भाजपने ते ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणात बदलले’

Lok Sabha Elections: विरोधी पक्षाने ‘लूट ईस्ट’ धोरण स्वीकारले आहे, तर भारतीय जनता पक्षाने (भाजप) ते ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणात बदलले आहे. त्रिपुरामध्ये भाजप सरकारच्या काळात अभूतपूर्व बदल झाले आहेत.

अगरताळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना भाजपा पदाधिकारी
अगरताळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना भाजपा पदाधिकारी

आगरतळा : विरोधी पक्षाने ‘लूट ईस्ट’ धोरण स्वीकारले आहे, तर भारतीय जनता पक्षाने (भाजप) ते ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणात बदलले आहे. त्रिपुरामध्ये भाजप सरकारच्या काळात अभूतपूर्व बदल झाले आहेत. 500 वर्षांनंतर अयोध्येतील त्यांच्याच मंदिरात प्रभू रामाची जयंती साजरी होत असल्याचे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर निशाणा साधला. आगरतळा येथील सभेत ते बोलत होते. त्यांच्या सरकारने भारतातील गरिबांसाठी तीन कोटी नवीन घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, त्रिपुरातील लोकांना याचा खूप फायदा होणार आहे. 500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, राम लल्लाला मंडपाऐवजी एका भव्य मंदिरात बसवण्यात आले आहे. पंतप्रधान म्हणाले की त्यांचे सरकार ईशान्येकडील ‘कनेक्टिव्हिटी’ वाढवण्यावर भर देत आहे. राज्यातील महामार्ग अपग्रेड करण्यासाठी 3,000 कोटी रुपये खर्च केले जातील, असे मोदी म्हणाले.

‘भ्रष्ट व्यक्तीला सोडले जाणार नाही’

पूर्वी, राज्यात मोबाइल टॉवर योग्यरित्या कार्य करत नव्हते, परंतु आता 5जी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी काम केले जात आहे. मोदी सरकारनेच मोबाईल बिल 400-500 रुपये प्रति महिना कमी केले आहे. जर काँग्रेस सत्तेत असती तर तुमचे मोबाईल बिल 4,000 ते 5,000 रुपये आले असते. काँग्रेस आणि माकपवर ताशेरे ओढत मोदी म्हणाले, “तपासणी यंत्रणांच्या वापरावर टीका करणारे काँग्रेसचे राजपुत्र आता केरळच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी करत आहेत. कोणत्याही भ्रष्ट व्यक्तीला सोडले जाणार नाही, असा इशाराही मोदींनी यावेळी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top