जालना येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जालना : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जालना शहरातील गांधीनगर भागात मंगळवार, 6 मे रोजी घडली. दरम्यान,  शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे.  

जालना : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जालना शहरातील गांधीनगर भागात मंगळवार, 6 मे रोजी घडली. दरम्यान,  शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे.  

        गेल्या काही वर्षांपासून जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. मोकाट कुत्र्यांनी अनेकांवर हल्ला केल्याच्या, चावा घेतल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत अनेक संघटनांनी महानगरपालिकेला निवेदने दिली. परंतू मनपाने त्यास केराची टोपली दाखवली आहे. मंगळवारी सकाळी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात  चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. संध्या प्रभुदास पाटोळे असे आठ वर्षीय मयत चिमुकलीचे नाव आहे. सकाळी ती अंगणात खेळायली गेली असता तीनचार कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करत तिचे लचके तोडले. यातच तिचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.  दरम्यान,  आमदार अर्जुनर खोतकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून आपण लवकरच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी याबाबत चर्चा करणार असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ते पाऊले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

निवेदनांना केराची टोपली 

जालना शहरातील  सामाजिक संघटना, वेगवेगळ्या संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत महानगरपालिकेला लेखी निवेदने देण्यात आलेली आहेत. परंतु प्रत्येक वेळेस टेंडर काढलेले आहे, लवकरच कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, असे पोकळ आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात येऊन सामाजिक संघटनांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली गेली आहे.  

 हृदयद्रावक घटना 

 ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून एका चिमुकलीला नाहक जीव गमावा लागला आहे.  मी याबाबत गंभीर असून जिल्हाधिकारी,  पोलीस अधीक्षक, महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी चर्चा करून तत्काळ यावर तोडगा काढणार आहे.  

–  आमदार अर्जुन खोतकर, जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »