दुबई : भारताने अखेर आशिया कप 2025 जिंकत पाकिस्तानला पराभूत केले. तिलक वर्माच्या तुफानी खेळीमुळे आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने विजयाचा तिलक लावला.

दुबई : भारताने अखेर आशिया कप 2025 जिंकत पाकिस्तानला पराभूत केले. तिलक वर्माच्या तुफानी खेळीमुळे आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने विजयाचा तिलक लावला.

आधी भारताने पाकिस्तानला 147 धावांत रोखले. भारतीय संघ विजयासाठी 148 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याानंतर आशिया कपमध्ये आतापर्यंत शानदार फलंदाजी करणारा अभिषेक शर्मा भारतीय डावाच्या दुसऱ्या षटकात 5 धावा काढून बाद झाला, पण त्यानंतर तिलक वरमाने दमदार कामगिरी दाखवत आशिया कप भारताच्या नावावर केला. तिलक वर्मा आणि शिवम दुबेने एकहाती फटकेबाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानला धूळ चारत भारताने विजय विजय मिळवत आशिया कपचा चॅम्पियन ठरला.


