कुरनूल (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे शुक्रवारी हैदराबादहून बेंगळुरूला जाणाऱ्या एका खाजगी बसला दुचाकीला धडकल्यानंतर आग लागली, ज्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी बहुतेक जण ओळखण्यापलीकडे जळाले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी डीएनए नमुने गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला बोलावले. रात्रीच्या वेळी झोपेतच प्रवाशांवर काळाने घाला घातला.

कुरनूल (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे शुक्रवारी हैदराबादहून बेंगळुरूला जाणाऱ्या एका खाजगी बसला दुचाकीला धडकल्यानंतर आग लागली, ज्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी बहुतेक जण ओळखण्यापलीकडे जळाले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी डीएनए नमुने गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला बोलावले. रात्रीच्या वेळी झोपेतच प्रवाशांवर काळाने घाला घातला.
कुर्नूलमधील चिन्नाटेकुरजवळ मोटारसायकल बसला धडकली, ज्यामुळे बसखाली आदळली आणि इंधन टाकीचे झाकण उडून गेले. कुर्नूल रेंजचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) कोया प्रवीण यांनी सांगितले की, आतापर्यंत जळालेल्या बसमधून १९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दुचाकीस्वाराचाही त्यात समावेश आहे. अपघातातील सर्वांची सखोल चौकशी आणि ओळख पटल्यानंतरच मृतांची आणि वाचलेल्यांची संपूर्ण माहिती कळेल. शॉर्ट सर्किटमुळे बसचा दरवाजा जाम झाला आणि काही सेकंदात बस पूर्णपणे जळाली. वाचलेल्यांपैकी बहुतेक २५ ते ३५ वयोगटातील होते.
मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत
पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाखांची मदत दिली जाईल. जखमींना ५०,००० रुपये देण्यात येतील.
