अहमदाबाद : एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनानी नगर परिसरात टेकऑफ केल्यानंतर काही क्षणातच कोसळले. विमानात २४२ जण होते, ज्यात १० क्रू मेंबर्स होते. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू होण्याची भीती आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

अहमदाबाद : एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनानी नगर परिसरात टेकऑफ केल्यानंतर काही क्षणातच कोसळले. विमानात २४२ जण होते, ज्यात १० क्रू मेंबर्स होते. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू होण्याची भीती आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एका निवेदनात म्हटले आहे की, अहमदाबाद विमानतळाजवळील निवासी भागात कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात २३२ प्रवासी आणि १० क्रू मेंबर्स होते. बोईंग विमान टेकऑफनंतर लगेचच खाली येताना दिसले आणि दुपारी २ वाजता विमानतळाजवळील मेघनानी नगर परिसरात ते कोसळले. अपघातानंतर लगेचच परिसरात काळ्या धुराचे मोठे ढग उठताना दिसले. आपत्कालीन प्रतिसाद पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तातडीने बचाव, स्थलांतर आणि अग्निशमन कार्य सुरू केले. सरकारी सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी दोघांनाही अहमदाबादला जाऊन या अपघातात बाधित झालेल्या सर्वांना तात्काळ मदत देण्यास सांगितले आहे.
अपघाताच कारण अद्याप अस्पष्ट
एअर इंडियाने ‘एक्स’ वर पोस्ट केले की, अहमदाबाद-लंडन गॅटविक फ्लाइट क्रमांक एआय१७१ आज, १२ जून २०२५ रोजी क्रॅश झाला. आम्ही सध्या तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच आमच्या वेबसाइटवर तसेच एक्स हँडलवर अधिक माहिती शेअर करू.” पोलिसांनी सांगितले की, विमान अहमदाबादच्या मेघनानगर भागात कोसळले. अनेक जखमींना शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
पोलिस उपायुक्त कानन देसाई म्हणाले, “आम्ही मृतांची माहिती गोळा करत आहोत.” अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया म्हणाले की, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.