जालना : श्रीरामनवमीनिमित्त जालना शहरातील स्व. गजानन तौर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीला हजारोंच्या संख्येने तरुणांनी उपस्थिती दर्शवली. शनिवार, 5 रात्री शहरातील अंबड चौफुली परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार नारायण कुचे, आ. हिकमत उढाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

जालना : श्रीरामनवमीनिमित्त जालना शहरातील स्व. गजानन तौर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीला हजारोंच्या संख्येने तरुणांनी उपस्थिती दर्शवली. शनिवार, 5 रात्री शहरातील अंबड चौफुली परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार नारायण कुचे, आ. हिकमत उढाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्व. गजानन तौर यांनी अंबड चौफुली येथे श्रीराम नवमी महाआरतीचा उपक्रम सुरु केलेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी कल्याणी तौर यांच्या प्रयत्नातून, फाऊंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन आ. नारायण कुचे, आ. हिकमत उढाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मान्यवरांचा कल्याणी तौर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक उमेश नळगे, नारायण टकले, अमोल भालेराव, उदय बोराडे, धनंजय पोहेकर, गणेश सुपारकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मण नवले यांनी केले. माऊली मांगडे यांनी युवकांना संबोधित करून तरुणाईमध्ये नवीन उर्जा निर्माण केली. यावेळी सौरभ जाधव, अक्षय वाघमारे, आशिष जोशी, राहूल झाल्टे, भगीरथ राऊत, प्रताप बोरसे, विकी म्हस्के, भागवत जगताप, आकाश वांगे, अभि गवारे, कमलेश झाडीवाले, गणेश सुरडकर, शुभम गोर्डे, संकेत खिल्लारे, बाळू जाधव, किशोर लबडे, ओमकार म्हस्के, अभि गवारे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
श्रीरामांच्या गाण्यांवर तरुणाई थिरकली
स्व. गजानन तौर हे श्रीराम भक्त होते. तसेच त्यांची विविध सामाजिक कार्यातही मोठा सहभाग असायचा. दरम्यान, श्रीराम नवमीनिमीत्त दरवर्षी अंबड चौफुली येथे महाआरतीचे आयोजन करायचे. दरम्यानच्या काळात त्यांचे एका हल्ल्यात निधन झाले. यानंतर ही परंपरा खंडीत पडू द्यायची नाही, म्हणून स्व. गजानन तौर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी भगवान श्रीरामांच्या विविध गाण्यांच्या तालावर जमलेल्या हजारो तरुणांनी ठेका धरला.