छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते पेटले असून कोणत्याही परिस्थतीत उमेदवारी मिळवायचीच हा चंग बांधून ते जीव द्यायला तयार झाले आहेत. पक्षासाठी आम्ही तीस वर्ष खर्च केलेत तिकीट घेतल्याशिवाय हटणार नाही असा इशारा देवून काहींनी अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शहरात पहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते पेटले असून कोणत्याही परिस्थतीत उमेदवारी मिळवायचीच हा चंग बांधून ते जीव द्यायला तयार झाले आहेत. पक्षासाठी आम्ही तीस वर्ष खर्च केलेत तिकीट घेतल्याशिवाय हटणार नाही असा इशारा देवून काहींनी अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शहरात पहायला मिळत आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपा या पक्षाची युती होईल अशी अपेक्षा होती. मात्र इच्छुकांची गद पहाता मंगळवारी, 30 डिसेंबर रोजी अर्ज भरण्याच्या दिवशी ही युती तुटल्याचे दोन्ही पक्षांनी जाहीर केले. परिमणामी शिवसेना-भाजपा पक्षातील इच्छुक आतातरी उमेदवारी मिळेल या आशेने पक्ष कार्यालय काठून ठिय्या देत आहेत. भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खा. भागवत कराड, आ. संजय केणेकर स्थानिक पातळीवर उमेदवारी देण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ मनपा निवडणुकीच्या नियोजनात आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्यादिवशी पर्यंत युती होईल अशी शक्यता होती. मात्र आज युती होऊ शकत नसल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र जागा एक आणि अच्छुक चार अशी अवस्था या दोन्ही पक्षात झाली आहे. त्यामुळे अर्ज वाटप करणाऱ्या स्थानिक नेत्यांची अवस्था बघण्यासारखी झाली असून उमेदवारी नेमकी कोणाला द्यावी असा पेच त्यांच्यासमोर आहे. मंगळवारी सकाळी भाजपाच्या दिव्या उल्हास पाटील या महिला कार्यकतने उमेदवारी घेतल्याशिवाय हटणार नसल्याचा पवित्रा घेतला तर दुसऱ्या एका महिनेले हाती पेट्रोलची बाटली घेवून ईथेच आत्मदहन करते असा इशारा दिला. भाजपा कार्यालयासमोर एका कार्यकर्त्याने ठाण मांडून मला न्याय द्या असा टाहो फोडला.
——
उमेदवार जाहीर न केल्याचा परिणाम
मागील दहा दिवसापासून दोन्ही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू आहे. मात्र मुलाखती नंतर उमेदवारी जाहीर न केल्याने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांच्या संतापाचा भडका उडाला. लवकर उमेदवारी जाहीर केली तर उमेदवारी न मिळालेले कार्यकर्ते प्रतिस्पध पक्षाकडे जातील अशी भीती पक्षश्रेष्टीना होती. त्यामुळे ऐनवेळापर्यंत युतीची चर्चा आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर करण्याची शक्कल या मंडळींनी लढवली. मात्र यात कार्यकर्ते निवडणुकी ऐवजी जीव देण्याच्या तयारीला लागले आहेत, याचे शल्य नेत्यांना नाही हे विशेष…
