न्यू चंदीगड : कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानचा पराभव करत आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवला. भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि ३०० धावांनी पराभूत केले, जो कसोटी इतिहासातील त्यांचा सर्वात मोठा विजय आहे.

न्यू चंदीगड : कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानचा पराभव करत आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवला. भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि ३०० धावांनी पराभूत केले, जो कसोटी इतिहासातील त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी, भारताचा सर्वात मोठा कसोटी विजय २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता, जिथे त्यांनी एक डाव आणि २७२ धावांनी विजय मिळवला होता. भारताने सर्वात मोठ्या कसोटी विजयाचा स्वतःचाच आठ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. तसेच अफगाणिस्तानविरुद्धचा हा भारताचा सर्वात मोठा विजय आहे.
यापूर्वी २०१८ मध्ये भारताने वेस्ट इंडिजला एक डाव आणि २७२ धावांनी पराभूत केले होते. तो सामना राजकोट इथे खेळला गेला होता. आता भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि ३०० धावांनी पराभूत केले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने आठ गडी गमावून ५६४ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी शतके झळकावली. ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही अर्धशतके केली. भारताने एका डावात केलेल्या धावा अफगाणिस्तानला दोन्ही डावांत मिळूनही करता आल्या नाहीत. अफगाणिस्तानने पहिल्या डावात १५२ धावा आणि दुसऱ्या डावात केवळ ११२ धावा केल्या.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात केवळ एकच कसोटी सामना झाला आहे, पण दौरा अजून पूर्ण झालेला नाही. आता तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळली जाणार आहे. पहिला सामना १३ जून रोजी होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. दुखापतीमुळे विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला असून, त्याच्या जागी यशस्वी जैस्वालचा संघात समावेश करण्यात आला आहे.
मानव सुथार – वॉशिंग्टन सुंदरची उत्कृष्ट कामगिरी
भारतीय संघाने पहिल्या डावात उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्यानंतर गोलंदाजांनी सूत्रे हाती घेतली. पदार्पण करणाऱ्या मानव सुथारने पहिल्या डावात २२ षटकांत सहा बळी घेतले. प्रसिद्धने तीन बळी आणि सुंदरने एक बळी घेतला. दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरने चार बळी घेतले. कुलदीप यादवने तीन बळी, तर मानव सुथार आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.


