बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून ७७ जण हद्दपार परभणी पोलिस अधीक्षकांची कारवाई

परभणी : बकरी ईद आणि गोवंश तस्करीसंदर्भातील गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ६ जून रोजी जिल्ह्यातून ७७ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या आदेशावरून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

परभणी : बकरी ईद आणि गोवंश तस्करीसंदर्भातील गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ६ जून रोजी जिल्ह्यातून ७७ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या आदेशावरून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या प्रकारांमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींचे वर्तन पाहता, त्यांच्याकडून पुन्हा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांनी संबंधित आरोपींची यादी तयार करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ नुसार त्यांना ६ ते ८ जूनदरम्यान हद्दपार केले आहे. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमांवर चेकनाके उभारण्यात आले आहेत, तसेच सर्व पोलिस ठाण्यांच्या स्तरावर नाकाबंदी सुरू असून, जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

पोलिस प्रशासन सोशल मीडियावरदेखील बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोणत्याही नागरिकांनी सामाजिक सलोखा बिघडवणारा मजकूर, फोटो किंवा व्हिडीओ शेअर करू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता पाळली जात असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »