रेतीची वाहतुक करणाऱ्या टिप्परने दोन बालकांना चिरडले; नागरीकांनी वाहनाला लावली आग

जळगाव जामोद :  तालुक्यात अवैघ गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची मुजोरी वाढली आहे. ९ मे रोजी सकाळी ११ वाजता भरधाव वेगातील अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या एका टिप्परने दुचकीला पाठीमागून धडक देवून दोन लहान बालकांना चिरडून ठार केल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या अपघातामुळे नागरीकांमध्ये एकच संताप उमटला असून नागरीकांनी सदर टिप्परला आग लावून रोष व्यक्त केला आहे.

जळगाव जामोद :  तालुक्यात अवैघ गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची मुजोरी वाढली आहे. ९ मे रोजी सकाळी ११ वाजता भरधाव वेगातील अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या एका टिप्परने दुचकीला पाठीमागून धडक देवून दोन लहान बालकांना चिरडून ठार केल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या अपघातामुळे नागरीकांमध्ये एकच संताप उमटला असून नागरीकांनी सदर टिप्परला आग लावून रोष व्यक्त केला आहे.

तालुक्यातील माऊली फाटा येथे 9 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. पळशी सुपो येथून शेगावकडे जाणाऱ्या प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर हे पती-पत्नी आपल्या दोन नातवंडांसह मोटरसायकलने प्रवास करत होते. भेंडवळजवळील माऊली फाट्याजवळ मागून भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही नातवंड दुचाकीवरील पार्थ चोपडे (6) रा. राजापेठ, अमरावती आणि युवराज मोहन भागवत (5) रा. बडनेरा यांचा जागीच मृत्यू झाला, तर आजी-आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेनंतर संतप्त जमावाने घटनास्थळी धाव घेत टिप्परला आग लावली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. अपघाताची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत खामगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनीही पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, संतप्त जमावाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक पोलिसांकडून वाळू माफियांदा सूट

जळगाव जामोद भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतुक होत आहे. याकडे महसुल प्रशासनासह स्थानिक पोलीस प्रशासनाकडून हेतूपूरस्पर दुर्लक्ष होत असल्याची ओरड स्थानिक नागरीकांकडून केली जात आहे. वाळू वाहतूक करणारे टिप्पर, टॅक्टर व अन्य वाहन मनमानी पध्दतीने भरधाव वाहने चालवून नागरीकांच्या जिवाला धोका निर्माण करत आहेत. अशा वाहनांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »