अदिती अर्बन व शिक्षक भारतीकडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव

बुलढाणा : कुठल्याही क्षेत्रात काम करतांना पूर्णपणे झोकून देऊन काम केले पाहिजे. चिकाटी, जिद्द व परिश्रम ही यशाची त्रिसुत्री आहे. विद्यार्थ्यांनी एकाच विषयात गुंतून न राहता नव नवीन क्षेत्राचे ज्ञान मिळविण्यासाठी अग्रेसर असले पाहिजे. प्रतिकुल परिस्थिती तुमच्या यशाचा मार्ग रोखू शकत नाही, फक्त तुमचे प्रयत्न प्रामाणिक असायला हवे. पालकांनीही मुलांवर दडपण न टाकता त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना उंच भरारी घेऊ द्यावी, असा सल्ला अदिती अर्बनचे संस्थापक, दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक तथा शिक्षक भारतीचे राज्य संघटक सुरेश देवकर यांनी दिला.

पालकांनो, मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ द्या : सुरेश देवकर

बुलढाणा : कुठल्याही क्षेत्रात काम करतांना पूर्णपणे झोकून देऊन काम केले पाहिजे. चिकाटी, जिद्द व परिश्रम ही यशाची त्रिसुत्री आहे. विद्यार्थ्यांनी एकाच विषयात गुंतून न राहता नव नवीन क्षेत्राचे ज्ञान मिळविण्यासाठी अग्रेसर असले पाहिजे. प्रतिकुल परिस्थिती तुमच्या यशाचा मार्ग रोखू शकत नाही, फक्त तुमचे प्रयत्न प्रामाणिक असायला हवे. पालकांनीही मुलांवर दडपण न टाकता त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना उंच भरारी घेऊ द्यावी, असा सल्ला अदिती अर्बनचे संस्थापक, दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक तथा शिक्षक भारतीचे राज्य संघटक सुरेश देवकर यांनी दिला.

  श्री संतनगरी शेगाव येथील अदिती अर्बनच्या सभागृहात रविवार 15 जून रोजी अदिती अर्बन व शिक्षक भारतीच्यावतीने दहावी व बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचकावर दैनिक महाभुमीचे कार्यकारी संपादक ब्रह्मानंद जाधव, शिक्षक भरतीचे जिल्हाध्यक्ष अशोक खोरखेडे, तालुकाध्यक्ष नितीन वाडे यांची  उपस्थिती होती. प्रारंभी संत गजानन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुणगौरव सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी

 शेगाव तालुक्यातील विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयामधून मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी 12वीच्या परीक्षेत विद्यालयातून प्रथम क्रमांक पात्र  केलेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचा मान्यवरांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन  गुणगौरव करण्यात आला. या सोहळ्याला शेगाव तालुक्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष नितीन वाढे यांनी केले. यावेळी दैनिक महाभूमिचे वितरण प्रतिनिधी ज्ञानेश्वर ताकोते, अदिती अर्बन शेगाव शाखा व्यवस्थापक विशाल खंडागळे, नांदुरा शाखा व्यवस्थापक चैतन्य ढोले, कपिल भारंबे, पवन बानाईत, ऋषी हजारे, वैभव चव्हाण, संतोष पाटील व अदिती अर्बनचे इतर कर्मचारी तसेच शिक्षक यांची उपस्थिती होती.

70 विद्यार्थ्यांचा सत्कार

दहावी, बारावीच्या परिक्षेत गुणानुक्रमे प्रथम आलेल्या सुमारे 70 विद्यार्थी, विद्यार्थीनींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन  गुणगौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »