अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर; राज्य सरकारची मोठी घोषणा : राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत शेती, घरांसह शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. याबाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे.

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत शेती, घरांसह शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. याबाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे.

राज्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती, घरे आणि जनावरांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली असून, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या मदतीचे मोठे पॅकेज जाहीर केले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या पॅकेजअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ जमिनीच्या नुकसानीसाठीच नव्हे, तर घरांचे व जनावरांचे नुकसान भरपाई म्हणूनही मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान, वाहून गेलेली जमीन, कोसळलेली घरे आणि मृत जनावरे यासाठी स्वतंत्र अनुदानाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रामपंचायत आणि महसूल यंत्रणेकडून पंचनामे पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा शेती उभी करण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

29 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील 1 कोटी 43 लाख 52 हजार हेक्टर जमिनीवर यंदा लागवड झाली होती. त्यापैकी 68 लाख 79 हजार 756 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने तत्काळ मदत कार्याला गती दिली आहे. ज्या भागात नुकसान झाले आहे, तिथे 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2059 महसूल मंडळांचा समावेश आहे. त्या सर्व भागात मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पीकनुकसान भरपाई दर (प्रती हेक्टर)

कोरडवाहू शेती – 18,500 

हंगामी बागायती शेती – 27,000

बागायती शेती – 32,500

रब्बी पिकांसाठी – अतिरिक्त 10,000

विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना – 17,000 

विमा उतरवलेल्या 45 लाख शेतकऱ्यांना – संपूर्ण नुकसानीसाठी भरपाई लागू

पशुधन आणि कुक्कुटपालन मदत (प्रती जनावर)

दुधाळ जनावरांना – 37,500 

ओढकाम करणाऱ्या जनावरांना – 32,000 

कुक्कुटपालनासाठी – 100 प्रती कोंबडी

एनडीआरएफमधील 3 जनावरांची मर्यादा रद्द, सर्व जनावरांसाठी मदत लागू

घरं, दुकाने आणि इतर पायाभूत मदत

पूर्णतः पडझड झालेली घरं – प्रधानमंत्री आवास योजनेत नवं घर समजून पूर्ण अनुदान

अंशतः पडझड झालेली घरं – प्रमाणानुसार मदत

डोंगरी भागातील घरांसाठी – 10,000 अतिरिक्त मदत

दुकान / व्यवसाय नुकसानीसाठी – 50,000 रुपये मदत

गोठ्यांच्या नुकसानीसाठी – 50,000 रुपये मदत

इतर विशेष तरतुदी

गाळ भरलेल्या विहिरींसाठी – 30,000 प्रती विहीर

खरडून गेलेल्या जमिनींसाठी – 47,000 प्रती हेक्टर रोख + 3 लाख हेक्टरी नरेगा अंतर्गत मदत

पायाभूत सुविधांच्या नुकसानीसाठी – 10,000 कोटींची तरतूद

ओला दुष्काळ म्हणून मदतीचा दर्जा

महसुलात सूट

कर्ज पुनर्गठन

शेतीशी निगडीत कर्ज वसुली स्थगित

विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

इतर दुष्काळसदृश सर्व सवलती लागू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »