परभणी : सर्वसामान्य जनतेने आम्हाला खुर्चीवर बसवले असून त्यांचे प्रश्न सोडवणे हाच आमचा प्रमुख अजेंडा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. परभणी येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी बोलत हाते.

परभणी : सर्वसामान्य जनतेने आम्हाला खुर्चीवर बसवले असून त्यांचे प्रश्न सोडवणे हाच आमचा प्रमुख अजेंडा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. परभणी येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी बोलत हाते.
यावेळी शिवसेनेच जिल्हाप्रमुख विशाल कदम, महानगराध्यक्ष आनंद भरोसे, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा आदींसह पक्ष्याचे विविध आघाडीचे प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान परभणी जिल्ह्यातील उजळंबा येथे एमआयडीसी, नागोबा मंदिर देवस्थान विकास, माळीगल्ली येथील महादेव मंदिर जिर्णोद्धार, परभणी शहरासाठी समांतर पाणीपुरवठा योजना आणि अंडरग्राउंड ड्रेनेज आदी कामे येत्या काळात पूर्ण करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
