जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध :   पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

बुलढाणा : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. सर्वांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करू या आणि बुलढाणा जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊ या, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांनी महाराष्ट्र दिनी केले.

बुलढाणा : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. सर्वांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करू या आणि बुलढाणा जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊ या, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांनी महाराष्ट्र दिनी केले.

पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 66 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, अजिक्य गोडगे, माजी आमदार विजयराज शिंदे, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय वाढीस लागण्यासाठी यावर्षी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत 4 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागेची लागवड केली असून शेतीपूरक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रतिसाद देत आहेत.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना व अटल भूजल योजनेंतर्गत सुमारे 33 हजार लाभार्थ्यांना सुमारे 79 कोटी रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे.  तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामामध्ये नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 1 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 144 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. अवेळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टीमुळे सुमारे 4 लाख शेतकऱ्यांचे 3 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले होते. त्याकरीता शासनाने सुमारे 490 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 19 व्या हप्त्याचा सुमारे 3 लाख 50 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »