मंदिराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू; आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील घटना  

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील सिंहचलम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. 

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील सिंहचलम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. 

बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास, घाट रोडवरील एका शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ ३०० रुपयांचे तिकिटे खरेदी करण्यासाठी लोकांची रांग लागली होती आणि त्याच ठिकाणी भिंत कोसळली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र आणि राज्य सरकारने सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. घटनास्थळी असलेल्या राज्याच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनी सांगितले की, प्राथमिक अहवालात असे दिसून आले आहे की, परिसरात मुसळधार पावसामुळे माती सैल झाल्यामुळे मंदिराची भिंत कोसळली. या अपघातात एक व्यक्ती जखमी झाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि सांगितले की त्यांनी या संदर्भात जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली आहे आणि जखमींना उपचार देण्यास सांगितले आहे. सिंहाचलममध्ये सात भाविकांच्या मृत्यूने खूप दुःख झाले… कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना असल्याचे नायडू म्हणाले.

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपये

मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे म्हटले आहे. प्रत्येक मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला धार्मिक देणगी विभागांतर्गत मंदिरांमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेशही दिले. या समितीमध्ये पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता वेंकटेश्वर राव, नगर प्रशासन विभागाचे प्रधान सचिव एस. सुरेश कुमार आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी ए. रवी कृष्णा यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »