अकोला : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सवानिमित्त राजंदा (ता.बार्शिटाकळी) येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे विभागीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा निःशुल्क असून इयत्ता ८ वी ते १२ वीचे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. शाळांनी ३१ डिसेंबरपर्यंत शाळास्तरावर विद्यार्थ्यांकडून निबंध लिहून घ्यावे, असे आवाहन श्री शिवाजी विद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

अकोला : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सवानिमित्त राजंदा (ता.बार्शिटाकळी) येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे विभागीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा निःशुल्क असून इयत्ता ८ वी ते १२ वीचे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. शाळांनी ३१ डिसेंबरपर्यंत शाळास्तरावर विद्यार्थ्यांकडून निबंध लिहून घ्यावे, असे आवाहन श्री शिवाजी विद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती व्दारा संचालित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राजंदा (ता. बार्शिटाकळी जि. अकोला) तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटात होणाऱ्या या स्पर्धेमध्ये गट अ इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी १. भाऊसाहेब देशमुख- शेतक-यांचे खरे हितचिंतक, २. पंजाबराव देशमुखांचे शिक्षण विषयक कार्य, ३. स्वच्छ गाव सुंदर गाव-भाऊसाहेबांचे ग्रामविकासाचे स्वप्न हे तीन विषय राहणार आहेत. तसेच गट ब इयत्ता ११ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी १. पंजाबराव देशमुख : ग्रामीण शिक्षण व सामाजिक परिवर्तनचे शिल्पकार, २. भारतातील कृषीक्रांतीचे प्रणेते भाऊसाहेब देशमुख, ३. भाऊसाहेबांचें जीवन कार्य व आजची युवा पिढी हे विषय राहणार आहेत. शाळांनी आपल्या सोयीनुसार ३१ डिसेंबरपर्यंत इच्छुक सहभागी विद्यार्थ्यांकडून निबंध लिहून घ्यावे, असे आवाहन श्री शिवाजी महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हानिहाय गट अ व ब साठी गट निहाय प्रथम बक्षिस १५०० रुपया व स्मृतीचिन्ह, द्वितीय बक्षीस १००० रुपये व स्मृतिचिन्ह आणि तृतीय बक्षीस ५०० रुपये व स्मृतिचिन्ह या प्रमाणे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच विभाग स्तरावर गट अ व ब साठी गट निहाय प्रथम बक्षीस ५००० रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय बक्षीस ३००० रुपये व स्मृतिचिन्ह आणि तृतीय बक्षीस २००० रुपये व स्मृतिचिन्ह या प्रमाणे बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन प्रतापसिंह देशमुख, उपाध्यक्ष अॅड. गजाननराव के. पुंडकर, डॉ. अविनाश बोर्डे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येत असून शाळा आणि विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन मुख्याध्यापक सुनिल चं. बैस, डी. व्ही. हुरसाळ, ई. व्ही. चव्हाण, व्ही. एन. ढुके, एन. व्ही. कपले, व्ही. के. भटकर, एस. डी. डाबेराव यांनी केले आहे.
