जालना : महावितरणच्या बेजाबदार कारभारामुळे जालना शहरातील आणि जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अघोषित भारनियमाला सामोरे जावे लागत आहे. कारण नसताना वीज पुरवठा तासनतास खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत महावितरणला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवार, 27 मे रोजी निवेदन देऊन निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.

जालना : महावितरणच्या बेजाबदार कारभारामुळे जालना शहरातील आणि जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अघोषित भारनियमाला सामोरे जावे लागत आहे. कारण नसताना वीज पुरवठा तासनतास खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत महावितरणला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवार, 27 मे रोजी निवेदन देऊन निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.
मनसेचे जालना शहराध्यक्ष महेश नागवे, राहूल रत्नपारखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जालना शहारातील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले. जालना शहरातील वीज पुरवठा अघोषित कालावधीसाठी कधीही कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित केला जात आहे. दिवसभरातून कित्येकदा वीज पुरवठा खंडित होतो. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत अनेकदा निवेदने देऊनही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. दुसरीकडे देखभाल दुरूस्तीची कामे देखील कऱण्यात येत नाही. त्यामुळे ठिकठिकाणी विजेच्या तारा, पोल लोंबकले आहेत. विद्युत पुरवठा करणारे रोहित्र उघडे पडलेले आहेत. यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोणतीही सुरक्षा साधने पूरवली जात नाही. त्यामुळे त्याच्या जीवितास देखील धोका निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीने याबाबत तत्काळ दखल घेऊन सुरक्षा साधनांची पूर्तता करावी. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा मनसेच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या घरातील वीज पुरवठा खंडित केला जाईल, याची नोंद घ्यावी, असा इशारा महेश नागवे यांनी दिला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगधरे, सचिव विलास तिकांडे, वैभव साठे, बळीराम राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.