dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

टी-२० विश्वचषकात भारत-पाक सामना होण्याची शक्यता: श्रीलंकेकडून पीसीबीला पुन्हा विचार करण्याची विनंती 

श्रीलंका : टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आशा निर्माण झाली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला या सामन्यावर पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर सरकारशी चर्चा करेल.

श्रीलंका : टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आशा निर्माण झाली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला या सामन्यावर पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर सरकारशी चर्चा करेल.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला सांगितले की, ‘आम्ही भारतासोबत मिळून या स्पर्धेचे आयोजन करत आहोत. जर भारत-पाकिस्तान सामना झाला नाही, तर आम्हाला महसुलाचे मोठे नुकसान होईल.’

पाकिस्तान सरकारने १ फेब्रुवारी रोजी पीसीबीला स्पर्धेत संघ पाठवण्यास मंजुरी दिली होती, परंतु भारताच्या विरोधात खेळण्यास नकार दिला होता. भारत-पाक सामना आयसीसी आणि ब्रॉडकास्टर्ससाठी सर्वात मोठा व्यावसायिक सामना मानला जातो, त्यामुळे आता यावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

या मुद्द्यावर श्रीलंका क्रिकेटने पीसीबीला मेल लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, भारत-पाक सामना न झाल्यामुळे श्रीलंका क्रिकेटला आर्थिक नुकसान होईल आणि स्पर्धेच्या प्रतिमेलाही धक्का बसेल. श्रीलंका या स्पर्धेचे यजमानपद भारतासोबत मिळून भूषवत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top