झिम्बाब्वे : भारताने सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकला आहे. शुक्रवारी संघाने इंग्लंडवर १०० धावांनी विजय मिळवला. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून ४११ धावा केल्या.

झिम्बाब्वे : भारताने सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकला आहे. शुक्रवारी संघाने इंग्लंडवर १०० धावांनी विजय मिळवला. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून ४११ धावा केल्या.
भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने ८० चेंडूंत १५ चौकार आणि १५ षटकारांसह १७५ धावा केल्या. कर्णधार आयुष म्हात्रे याने ५३ धावा केल्या. सेबास्टियन मॉर्गन आणि अॅलेक्स ग्रीन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवरच बाद झाला. आरएस अँब्रिसने ३ बळी घेतले. कॅलेब फॉकनरने ११५ धावा केल्या. त्याने एका टोकाला खंबीरपणे पकड ठेवली, पण दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या, ज्यामुळे इंग्लंडचा पराभव झाला.
वैभवच्या ८० चेंडूंत १७५ धावा
१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ विश्वचषक फायनलमध्ये विक्रमांची मालिका रचली. अंतिम सामन्यात त्याने ८० चेंडूंमध्ये १७५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १५ चौकार आणि १५ षटकार मारले. त्याच्या फलंदाजीमुळे भारताने ५० षटकांत ४११ धावा केल्या.
