जालना : आपले संपूर्ण जीवन आपण दुसऱ्यांनी घालून दिलेली पायवाट आणि प्रतिक्रियेवरच जगत असतो. सांगणाऱ्यांनी तटबंदी निर्माण केली, आपल अवकाश आपण बंदिस्त करून ठेवले. स्वतःच्या पायवाटेने, स्वतःचे अस्तित्व नाही अशा स्थितीत “हजारो फुलांच्या जाती गुण्या-गोविंदाने नांदत असताना दंगल झाल्याचे ऐकिवात नाही. असे संपूर्ण साहित्य चार ओळीत विशद करण्याचं विलक्षण सामर्थ्य डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या काव्यसंग्रहांत आढळते, असे प्रतिपादन समीक्षक प्रा. मधुकर जोशी यांनी केले.

जालना : आपले संपूर्ण जीवन आपण दुसऱ्यांनी घालून दिलेली पायवाट आणि प्रतिक्रियेवरच जगत असतो. सांगणाऱ्यांनी तटबंदी निर्माण केली, आपल अवकाश आपण बंदिस्त करून ठेवले. स्वतःच्या पायवाटेने, स्वतःचे अस्तित्व नाही अशा स्थितीत “हजारो फुलांच्या जाती गुण्या-गोविंदाने नांदत असताना दंगल झाल्याचे ऐकिवात नाही. असे संपूर्ण साहित्य चार ओळीत विशद करण्याचं विलक्षण सामर्थ्य डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या काव्यसंग्रहांत आढळते, असे प्रतिपादन समीक्षक प्रा. मधुकर जोशी यांनी केले.
शिवनगर परिसरातील तडेगांवकर यांच्या निवासस्थानी ‘गच्चीवरचा शब्दमोहोर’ या साहित्यिक उपक्रमांतर्गत शनिवार, 7 जून रोजी सायंकाळी चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कवयित्री डॉ. संजीवनी तडेगांवकर यांच्या ‘भुईतून उगवलेली बाई ‘ या आगामी कवितासंग्रहातील निवडक कवितांचे अभिवाचन , समीक्षात्मक संवाद, सेवानिवृत्ती बद्दल प्रा. डॉ. शोभा यशवंते यांचा सत्कार सोहळा पार पडला.
जेष्ठ कवयित्री रेखा बैजल यांनी ‘काट्यांचा उरूस’ या कवितेवर भाष्य करताना प्रतिमा, सामाजिक वास्तवता आढळते, भाव सहजपणे येतात असे सांगितले.
चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी निसर्गाचे सौंदर्य डॉ. संजीवनी तडेगावकर यांना नेमकेपणाने हेरता येत असल्याचे नमूद केले. गुलाबराव पाटील यांनी ‘भ्रमाचा भोपळा’ या कवितेवर भाष्य करताना पतीपत्नीच्या तर्काचे विचार संशयात रूपांतरित होतात. वेदना, वास्तवाचा चपखल अर्थ वाचतांनाच समजतो, असे सांगितले.
प्रस्ताविक पंडित तडेगांवकर यांनी केले.
डॉ. उध्दव थोरवे, प्रा. शशिकांत पाटील, डॉ. पुरूषोत्तम जुन्ने यांनी ‘भुईतून उगवलेली बाई’ मधील कवितांचे अभिवाचन करून समीक्षात्मक भाष्य केले. याप्रसंगी सेवानिवृत्ती बद्दल प्रा. डॉ. शोभा यशवंते यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
प्रारंभी ज्येष्ठ समाजसेवक कै. बाबुराव सतकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सूत्रसंचालन प्रा. डॉ.शोभा यशवंते, प्रा. अशोक खेडकर यांनी केले. डॉ. संजीवनी तडेगांवकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. नारायण बोराडे, डॉ.जगन्नाथ खंडागळे, एस. एन. कुलकर्णी, प्रा. बसवराज कोरे, शिवकुमार बैजल, विनीत साहनी, प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके, प्राचार्य सुनील सोलाट, डॉ. सुधाकर जाधव, बाळासाहेब तनपुरे, डॉ. संदीप पाटील, ॲड. देवराव सोनवणे, पांडुरंग सांगळे, शांतीलाल बनसोडे, डॉ. राज रणधीर, बाबासाहेब तरवटे, प्रदीप देशपांडे, संगीता राजेंद्र राख, डॉ.अस्मिता शिंदे, सीमा रसाळ, संतोष लव्हटे आदींची उपस्थिती होती.
महिला व बालकांसाठी कार्य करणार : डॉ. यशवंते
साहित्य वाचन, कवी मैत्रिणींचा सहवास यांचे प्रभाव आपल्यावर पडले. सातत्याने होत असलेल्या साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमांमुळे जिल्ह्याचे वातावरण हे कवी मनाचे होत आहे. छोटी बालके आणि वृद्ध महिला यांच्याशी संवाद साधण्यास आपल्याला आवडत असून निवृत्तीनंतर हा उपक्रम आपण नेटाने राबविणार असल्याचे प्रा. डॉ. शोभा यशवंते यांनी सत्कारास उत्तर देतांना सांगितले.